मी नथुराम गोडसे बोलतोय. हे नाटक मी एके दिवशी पाहिलं आणि मला शिकवला गेलेला इतिहास आणि स्वतःहुन माहिती करुन घेतलेला यामध्ये प्रचंड तफावत आढळली. आपल्याला शिकवलेला इतिहास हा नेहमीच कॉंग्रेस प्रणित असतो हेच माझ्या लक्षात आले. गांधी हत्येबद्दल कॉग्रेस प्रणित इतिहास एका नथुराम गोडसे नावाच्या हिंदु माथेफिरुने केलेली हत्या असेच वर्णन ऐकले होते. पण गोळी झाडाणारा नथुराम कोण होता? गांधी हत्येमागे नेमके कारण कोणते होते? गांधींच्या अहिंसावादी तत्वाला काही आधार होता की नाही? अखंड भारताच्या फाळणीला जीनांबरोबर गांधीही तितकेच जबाबदार होते का? गांधींच्या म्हणण्यानुसार मंत्रिमंडळाने पाकिस्तानला ५५ कोटी रूपये मदत म्हणुन का दिली. ( त्या रुपयांचावापर पाकिस्तानने काश्मीरमध्ये लढणार्या आपल्याच देशातील सैनिकांविरूद्ध वापरला. ) या सर्व आणि अशी अनेक प्रश्न निरुत्तरीत राहिली. मी आपल्यासमोर "मी नथुराम गोडसे बोलतोय" या नाटकाचा सारांश नथुराम गोडसे यांच्याच शब्दात मांडण्याचा एक क्षीण प्रयत्न करीत आहे.
नथुराम गोडसे उवाच्
सगळे चेहरे अनोळखी. खरं म्हणजे अनोळखी हा शब्दच चुकीचा आहे, अनोळखी हा शब्द अभावाने का होईना पण ओळखीचा उच्चार, तुम्हा सगळ्यांचेच चेहरे मला नवीन पण नवीन आहेत म्हणजे परके नव्हेत तुमच्यापैकी तरुण असतील तेव्हा त्यांचा जन्मही झाला नसेल. शासकीय इतिहासात केवळ एक हिंदु माथेफिरु म्हणुन तुम्ही माझी नोंद पाहिली असेल. तुमच्या मध्ये मध्यमवयीन असतील त्यापैकी काही त्यावेळी चाललेल्या ब्राह्मणाच्या कत्तलीपासुन ते जीव वाचवु पहाणार्या आपल्या आई - वडिलांना कोण हा नथुराम त्याच्यामुळे आमची घर का जळता आहेत अशा विचार करत असतील. हं ! पण अगदी म्हातारे म्हणजे जुनीखोडं असतील त्यांना मात्र मी आठवत असेन; वृत्तपत्रातुन वाचलेला, आकाशवाणीवरुन ऐकलेला मी ! त्यापैकी काहींनी माझं आणि नाना आपटेंच अग्रणी हे वृत्तपत्र वाचलं असेल. सभांमधील माझी भाषण ऐकली असतील, कदाचित प्रत्यक्षात येऊन भेटलेही असतील. पण ती भेट आणि ही ओळख ३० जानेवारी १९४८ नंतर मात्र त्यांनी सतत नाकाराली असेल. हो पण इतक्या म्हातार्या माणसांना कोण घेऊन येणार? माझं वय काय आहे ठाऊक आहे का तुम्हाला? ९३ वर्षे ! पटत नाही ना. तुम्ही म्हणाल खोट बोलतोय, तरुण तर दिसतोस. पण माझ्या चिरतारुण्याचे रहस्य आहे, माझा मृत्यु! अवेळी झालेला. मृत्यु हे चिरतारुण्याचं वरदान आहे असं नाही वाटत तुम्हाला? नाही पटत! आपल्या जवळच्या एखाद्या मृत व्यक्तीची प्रतिमा आणा डोळ्यासमोर २० - २५ वर्षापुर्वी मृत झालेल्या एखाद्या व्यक्तीची प्रतिमा ! तिच्या चेहर्यावर सुरकुत्या दिसतायत तुम्हाला? दात अजुनही शाबुत असतील केस काळेभोर असतील, असो. तर तो तरुण आहे कारण तो मृत आहे. वृद्धत्वाचा शाप जिवंत शरीराला असतो. मला चिरतारुण्याचा आशिर्वाद तात्याराव सावरकरांनी दिला आहे. तात्याराव सावरकर; सुर्याची उबदार प्रखरता, वार्याचा वेग, खडकाने हेवा करावा अशी कठोरता आणि प्रत्यक्ष बृह्स्पतीने शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्बता या सर्वांनी धारण केलेला मानवीय अवतार म्हणजे तात्याराव सावरकर. मला अजुनही आठवतो तो दिवस अटकेत होतो मी, माझी चौकशी चालु होती आणि बादरायण संबंध नसताना केवळ छळ करण्याच्या उद्देशाने त्या भिष्माचार्याला अटक करुन दिल्लीला आणलं. तात्यारावांना पाहताच क्षणी मी उठलो त्यांना नमस्कार केला. तात्याराव म्हणाले ' चिरंजीव हो'. मी म्हटलं तात्याराव माफ करा पण तुमच्या या आज्ञेच पालन माझ्याकडुन होईल अस मला नाही वाटत. तात्याराव म्हणाले वेडा आहेस नथुराम मी शतःयुषी हो असे नाही म्हटले, मी चिरंजीव हो असं म्हटलं आणि तु चिरंजीव झाला आहेस नथुराम ज्याक्षणी तु पिस्तुलाचा चाप दाबलास आणि गांधी मृत झाले त्याचक्षणी नथुराम गोडसे हे नाव चिरंजीव झालं आहे. गांधीवाद तु संपवलास की नाही हा कदाचित वादाचा मुद्दा ठरेल पण तु गांधी संपवलेस आणि स्वतः उरलास. गांधींचे विरोधक सच्चे हिंदु राष्ट्र्वादी तर तुला आपल्या हृदयसिंहासनात अढळपद बहाल करतीलच पण गांधींचे समर्थक ही त्यांच्या चरित्रात तुला अमररुप देतील.गांधीच्या माता- पित्यांच्या उल्लेखाशिवाय शिवाय जसा त्याच्या कुठल्याच चरित्राचा प्रारंभ होऊ शकत नाही तसेच तुझ्या उल्लेखाशिवाय त्यांच कुठलच चरित्र पुर्ण होऊ शकत नाही. तात्यारावांचे शब्द ते शिलालेखच जणु, तात्यारावांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द म्हणजे भेद आणि लिहिलेला प्रत्येक शब्द म्हणजे वेद, मग तो खोटा कसा ठरणार? तर असा मी ९३ वर्षांचा बुड्ढाचारी ३९ व्या वर्षी सुळावर चढलेला, अवेळी मृत्यु. अवेळी होता पण आमंत्रित होता स्वीकृत होता , पण चिरतरुण! त्या अश्वथाम्यासारखा, त्या अश्वथाम्याच्या डोक्यावर खोल जखम झाली आहे म्हणुन तो तेल मागत फिरतो आहे. माझ्या हृदयात मस्तीक्षात खोल जखम झाली आहे किती वार झाले आहेत त्या जखमेवर देशाचे काष्ठानी केलेले तुकडे निर्वासितांमधील माता - भगिनींवर झालेले बलात्कार, पाकिस्तानला गांधींच्या बालहट्टापायी बहाल केलेले ५५ कोटी रुपयाचं अनुदान आणि अखंड हिंदुस्तानातुन अलग करुन पाकिस्तानला बहाल केलेली माझी सिंधु नदी. त्या अश्वथाम्याला अजुनही तेल हव आहे. पण मला मात्र स्पर्श हवा आहे तो त्या पवित्र पाण्याचा, त्या स्पर्शाची वाट माझ्या अस्थी पहात आहेत, गेली ६० वर्षे. माझ्या मृत्युपत्रात लिहुन ठेवले आहे माझ्या अस्थी पिढ्यान् पिढ्या हस्तांतरीत कराव्यात परंतु अखंड सिंधु अखंड हिंदुस्तानात येईपर्यंत त्या विसर्जित करु नयेत. माझं मृत्युपत्र वाचल्यानंतर तात्याराव म्हणाले, ' वाह नथुराम, आधुनिक भारतातील दधीची आहेस तु. तुझ्या या अस्थींनी शस्त्र होतील.' मी म्हटलं तात्याराव कशाला इतक्या मोठ्या माणसाची उपमा देता. भवानी तलवार लोखंडाची असली हे जरी सत्य असलं तरी लोखंडाचा प्रत्येक तुकडा भवानी तलवार नाही होऊ शकत. पण निरुत्तर होतील तर ते तात्याराव कसले त्यांच्या समोर प्रश्न नव्हतेच त्यांच्या समोर फक्त उत्तर होती. तात्याराव म्हणाले, ' नथुराम महाराजांनी स्पर्श केला म्हणुन तलवारीची भवानी झाली तलवारीच्या पात्यापेक्षा मुठ जास्त महत्वाची, मुठी मागच्या पकडीमागे जिद्द असेल तरच तलवारीला धार येते. तु मागे अस्थी ठेवत नाही आहेस वृत्ती ठेवतो आहेस विचार ठेवतो आहेस त्यांची शस्त्र होतील.'
माझ्या आयुष्याचे जे सोनं झालं त्यात माझा वैयक्तिक सहभाग इतकाच की मी लोखंडासारखा तात्याराजवळ गेलो आणि त्याच्या स्पर्शाने माझं सोनं झालं. माझ्या आयुष्यातल्या चुकांची दुर्गुणांची जबाबदारी माझी. जे हातुन चांगलं घडल त्याचं श्रेय मात्र तात्यारावांच. वाईटाचे उत्तरदाइत्व त्यांच्याकडे नाही. सुवर्णालंकार देवाच्या मुर्तीला आभुषित करण्याऐवजी तस्करांकडे गेले तर तो दोष परिसाचा नव्हे. नाही का?
तर असा मी ९३ वर्षांचा बुड्ढाचारी नथुराम विनायक गोडसे. गेल्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या शेवटी शेवटी माझा जन्म झाला. १९ मे १९ १०. वडिल विनायकराव पोस्टात नोकरी करायचे, आईचं नाव लक्ष्मी. विष्णुचे अनेक अवतार तुम्ही पाहीले असतील. पण लक्ष्मीचा फक्त कष्ट आणि वनवास भोगण्यासाठी घेतलेला अवतार गोडस्यांच्या घराव्यतिरिक्त कोणीही कुठेही पाहीलेला किंवा ऐकीवात नसेल. दशरथासारखा पुत्रवियोग सहन करीत तिने प्राण सोडले. वेदना तीच, तळमळ तीच, पुत्रप्रेमही तेच. फक्त राम वनवासाला निघाला नव्हता. त्याने परलोकाच्या प्रवासाची तयारी केली होती. लक्ष्मण कारागृहात कुजत सडत पडला होता. उर्मिला जवळ होती पण या लक्ष्मणाने श्रावणबाळाला कधीच मारलं नव्हतं.असो, विनायकरावांना मासिक वेतन रू १५/-, रू १०/- मध्ये चरितार्थ चालवायचा आणि रू ५/- वडिलांना पाठवायचे. विनायक आणि लक्ष्मीला तीन मुले झाली एकही जगलं नाही नवस आयास झाले. मुलगा जगावा म्हणुन, मग मुलगा झाला तो नथुराम. जगला ! , त्यांच्या नशीबी पुत्र वियोग होता म्हणुनऽऽऽऽ, गांधी हत्या व्हायची होती म्हणुन. त्यानंतरच आयुष्य सुरळीत गेलं. लहानपणी कधीच चोरी केली नाही त्यामुळे वडिलांची माफी मागण्याचा कधी प्रश्नच आला नाही. ब्रह्मचर्य पालन करण्याची शपथ कधीच घेतली नाही ब्रह्मचर्य पालन करतच होतो. निर्वासितांमध्ये खुप फिरलो त्यांना अन्नवस्त्रांचीही मदत केली परंतु ते अर्धनग्न अवस्थेत आहेत म्हणुन मी अर्धनग्न अवस्थेत कधीच राहीलो नाही, सुत कातलं नाही, संडास साफ केले नाहीत आणि फासाच्या दोरावर चढेपर्यंत मौन कधीच पाळले नाही. तस गांधींच्या आणि माझ्यात साम्य किंवा कॉमन पॉईन्ट एकच मी त्यांचा वध केला आणि त्यांच्या वधामुळे माझा अंत झाला. पण फरक मात्र मोठा, ते त्यांच्या तत्वांसाठी जगायला तयार होते आणि मी माझ्या तत्वांसाठी मरायलाही तयार झालो.
अर्थात माझ्या या आयुष्यात तुम्हाला स्वारस्य असण्याच काहीच कारण नाही , नाही का? गड चढुण जाण्यापुर्वी ती हिरकणी कोण होती? विलायती कपड्यांनी भरलेला ट्रक छातीचा कोट कडुन अडवणारा बाबु गेनु जगला तो फक्त मृत्युचा क्षण. या अर्थाने नथुराम गोडसेच खरं चरित्र सुरु होतं ते ३० जानेवारी १९४८ पासुन गांधी वधानंतर खर तर नथुराम आयुष्य जगला ते फक्त ६५५ दिवस ३० जानेवारी १९४८ ते १५ नोव्हेंबर १९४९ आणि या चरित्राचा श्रीगणेशा झाला तो मंत्रिमंडळाने पाकिस्तानला ५५ कोटी रुपयांचा निर्णय घेतला त्या दिवशी. नाना आपटे तेव्हा मला विचारायला आले की आजचा अग्रलेख का बदलास? त्यावर मी म्हणालो आधी लिहीलेला अग्रलेख मला खोटा वाटायला लागला, नानाला तर विश्वासच बसला नाही की मी खोटा अग्रलेख का लिहीन ते? नानाला म्हणालो , ' नाना अग्रलेखाच नाव विचारलस नाही."क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे." मी लिहलं आहे की उद्याच्या संक्रांतीला आपण दसरा साजरा करुया. शमीच्या वृक्षावरुन शस्त्र काढुन सिमोल्लंघन करुया.' त्यावर आपल्याला अटक होऊ शकते अशी शंका नानाने उपस्थित केली. मी त्याला म्हणालो, 'आपलं अग्रणी हे हिंदु मुखपत्र आहे. अजुन सरकार हिंदुनाच टिचभर महत्व द्यायला तयार नाही तर त्यांच्या मुखपत्राला काय देणार? आपल्या संयमाचा चुकीचा अर्थ लावला जातो. हिंदुंची होणारी कत्तल दुर्लक्षिली जाते आहे कारण आपण गप्प बसणार सहन करणार हे गृहितच धरल जातं. शेकस्पियरचे एक वाक्य आहे ना - घावांना जर जिव्हा असत्या तर त्यांनी वेदना बोलुन दाखवल्या असत्या - पण आपल्या घावांना जिव्हा नाहीत तर फक्त अश्रु आहेत. आपल्या क्रोधाला फक्त अंगार नाही तर क्षमाशिलता आहे, इतरांनी अत्याचार करायचे आणि आपण ते सहन करायचे यात काही विशेषच मानल जात नाही, तो सृष्टी नियमच मानला जातो. सरकार माझ्या विधानांची गंभीर दखल घेईल पण ती गांधी हत्येच्या खटल्याच्या वेळीच. गांधींना थोपवण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे त्यांचा वध करणे. पण नानाला मात्र हे पाऊल आततायी आणि अविचारी वाटत होतं. वध करणे एवढ अनिवार्य आहे का? असा त्याचा सवाल होता. मी त्याला म्हणालो, ' घे बंदुक आणि घाल गोळी इतकी कुठलीही हत्या सोपी नसते, अकस्मात नसते. खुन असेल कदाचित पण वध नाही. आणि गांधीवध तर नाहीच नाही. वधाला जर अधिक विलंब हानिकारक होईल असही मला वाटतं.' इतिहासाच्या एका खंडाला आपण धक्का लावतो की काय असे वाटत असावे कदाचित नानाला. पण खंड वगैरे अशा मोठ्या शब्दांबद्दल माझं दुमत असल तरी इतिहासाच्या पानाला मी नक्कीच धक्का लावत नव्हतो. पण जर पान हे आज उलटलं नाही तर देशाच्या इतिहासाची बाकी पान कोरीच राहतील. काळाची पान उलटता येतात, फाडुन फेकता येत नाही. गांधींचे देशाच्या इतिहासातील पान कोणीही नाकारु शकत नाही आणि नथुरामसुद्धा ते करु इच्छित नाही त्यांच पान तसचं राहणार पुन्हा कधीतरी झंझावाती वादळ येईल, पानांची उलथापालथ होईल आणि ते पान पुन्हा समोर उघड होऊन पडेल. गांधींच अहिंसेच तत्व मी नाकारत नाही आहे. जगाला हिंसेपेक्षा अहिंसाच जास्त आवश्यक आहे. पण गांधींची अहिंसा स्वसंरक्षण स्वहित नाकारते. स्वसंरक्षण म्हणजे हिंसा नव्हे. स्वतःच्या अस्तित्व रक्षणासाठी धडपडणे याची व्याख्या हिंसा असे करणारी अहिंसा म्हणजे एक प्रकारे स्वःहिंसा नव्हे का? नानाला वाटत होतं की माझा हा निर्णय धाडसाच आहे. पण धाडस तर करावचं लागणार आणि कुणीतरी करायला हवं म्हणुन सगळेच वाढ बघत बसले तर हे कदापि होणार नाही. अर्थात निदर्शन करुनही बघितली पण त्याचाही काहीच फायदा झाला नाही. देशाच्या विभाजनाच्या वेळीही आम्ही निदर्शनच करत होतो. देशाच्या विभाजनाचा निर्णय हा अनावश्यक होता. अरे मुसलमानांची लोकसंख्या आणि टक्केवारी ती किती? त्यांचा संपुर्ण देशासाठी असलेला अठ्ठ्हास अनाठायी होता. तो तसा नसता तर मौलाना आझाद हिंदुस्तानमध्ये राहिले नसते. पण जीनांच्या वेड्या हट्टाला मान्यता देऊन केवळ कोणाचं मन मोडायच नाही, हिंसा नको म्हणुन गांधींनी विभाजनाला मान्यता दिली. व्यक्ति देशापेक्षा कधीच मोठी नसते आणि गांधी ही व्यक्ति स्वतःला देशापेक्षा मोठी समजु लागली तर मग देशसेवा , त्याग, या शब्दांना काय अर्थ राहतो. मुसलमान पंतप्रधान होण्यास तसा आमचा कधीच विरोध नव्हता पण लोकशाहीत तलवार उपसुन मागणी करायची नसते. जीनांनी तलवार उपसली आणि ती गांधींनी भारतमातेच्या छातीत खुपसुन लचका तोडला. अखंड सिंधु नदी हिंदुस्तानातुन निघुन गेली , देशाचा तुकडा पडला. त्याला जितके जीना जबाबदार तितके गांधींही जबाबदार, ते तर परकीय आणि हे स्वकीयच! नाही का? काय कमी निदर्शन केली होती का आम्ही? तेव्हाही बालभवनासमोर निदर्शनच करत होतो, शांततामय निदर्शनं. गांधी जीनांना जेव्हा भेटायला निघाले तेव्हा आम्ही त्याची गाडी अडवली त्यांना सांगितलं नका जीनांशी तडजोड करु, नका देशाचा तुकडा मोडु.पण आपला हा राष्ट्रपिता आपल्या छातीवर पाय ठेऊन पाकिस्तानच्या निर्मितीसाठी सुईणीसारखा त्यांच्या मदतीला धावला. मंत्रिंमंडळाच चुकलं एकच की ते गांधीजींच्या आमरण उपोषणाच्या धमकीपुढे नमले. गांधींनी स्वतःच्या देहाच्या अस्तित्वाला जेव्हा जेव्हा आव्हान उभ केलं तेव्हा तेव्हा मंत्रिमंडळ झुकलं. देशाच्या अहिताचेच निर्णय घेतले गेले. हा देहच यापुढे देशाच्या विनाशाचे कारण ठरणार होता. आज मुसलमान एक तुकडा मागुन घेऊन गेले उद्या शिख मागतील आणि परवा हिंदु मागतील पण हिंदुंच्या तुकड्याचे चा्र्तुवर्णीय चार तुकडे करतील, पुन्हा त्या वर्णांमध्ये उपजाती आहेतच, मग अखंड भारतवर्ष या संज्ञेला काय अर्थ राहतो. ब्रिटीशांची आपण एकत्र का लढलो? भगतसिंगाने फक्त पंजाबच का नाही मागितला? सुभाषचंद्र बोस आझाद हिंद फौज घेऊन फक्त बंगालसाठीच का नाही आले? सुदावरदीने हिंदुची कत्तल केली तेव्हाही आम्ही निदर्शनच करत होतो. सुदावरदी राजदबावाला शरण आला परंतु त्याचे अनुयायी कत्तल करतच होते. आमची निदर्शन सुरु होती आणि गांधींचे आमरण उपोषण सुरु होते. शेवटी हिंदुंनी शस्त्र खाली ठेवली. मला अजुनही आठवतं आहे, एक गरीब हिंदु पुढे आला आणि बापुंना म्हणाला - बापु तुमच्या हत्येच पातक माझ्या कपाळी नको आहे म्हणुन मी शस्त्र तुमच्या पायाशी ठेवतोय. पण मुसलमान मोहल्यात माझं एकच हिंदुच घर आहे - त्या रात्री हैद्राबाद सोडण्यापुर्वी मी त्या हिंदुकडे गेलो. त्याच्या घरी एकच हलकल्लोळ माजला होता. त्याच्या ८ वर्षाच्या मुलाची कत्तल केली होती मुसलमानांनी पण त्याच्याकडे फक्त आक्रोश होता आपल्या मुलाचं कत्तल केलेलं कलेवर माझ्या समोर फेकुन तो मला म्हणाला - जा हे तुमच्या गांधींकडे घेऊन जा, याचं रक्त घेऊन जा आणि त्यांना सांगा पुन्हा उपोषणाला बसलात तर मोसंबीचा रस पिऊ नका याच रक्त प्या.- काहीच बोलु शकलो नाही मी कारण गांधी माझेही राष्ट्रपिता होते. त्यांचा राष्ट्रपिता म्हणुन मीही स्विकार केला होता. क्षणभर अस वाटलं की घुसाव त्या मोहल्यात आणि एकेका मुसलमानाला बाहेर काढुन कापावं.पण मग विचार केला संहारच करायचा तर संरक्षण का? आता जर मी संहार केला तर मीही त्यांच्या इतकाच असंस्कृत ठरेन. नानाने मला तात्यारावांचा सल्ला घेण्यास सांगितले पण मला ते नको होते सतीच वाण घेतलेल्यांना अग्निच भय नसतं पण तात्यारावांच्या कष्टायत्नात माझ्या हातुन चुकुनही एकही संविधा पडायला नको. तात्याराव एकदा म्हणाले होते जर गांधी राजकीय संत असतील तर त्यांनी रामदास स्वामींचा आदर्श ठेवावा गरज पडली तर रामदास स्वामी सदैव शिवबाच्या पाठी उभे होते पण त्यांनी मात्र स्वराज्य उभारणीत कधीही लुडबुड केली नाही. वध करण्याच्या आधी मी नाना आपटे कडुन दोन वचने घेतली, मला आता एकटाच प्रवास करायचा होता कारण मी वध उघडपणे करणार होतो आणि स्वतःला स्वाधीन करणार होतो त्यामुळे नाना माझ्या सोबत असणे त्याच्यासाठी धोक्याचे झाले असते म्हणुन मी नानाला माझी साथ सोडायला सांगितली हे पहिलं वचन. वधानंतर मी लिहिलेला लेख अग्रणीत छापायचा हे नानाकडुन घेतलेलं दुसर वचन. एवढ्या वर्षांची साथ सोडायला सांगताना माझ्या जिवाला जड जात होतं. पण एक वध एक फाशी याच तत्वावर मला पुढची पावलं टाकायची होती. एका वधासाठी मला दोघांना फाशी मला मान्य नव्हती. खटल्यामध्ये मी गांधी हत्या का समर्थनीय आहे? याची माझी बाजु तर मांडणारच होतो. आणि त्यामुळे गांधी हे हिंदुस्तानचे नसुन पाकिस्तानचे राष्ट्रपिता आहेत आणि त्यांचा वध हे अपरिहार्य कर्तव्य आहे याची मला खात्री पटली.
३० जानेवारी १९४८ संध्याकाळी ५ च्या पुर्वी १० एक मिनीटे असताना मी बिर्ला भवनाच्या दाराशी गेलो. दारावरील पहारेकरी प्रार्थनेला जाणार्यांचे निरीक्षण करत होते. त्यांचं मला सर्वात अधिक भय होतं, म्हणुन चार पाच लोक जात होते, त्यांच्यातलाच मी एक आहे असं समजलं जावं ही दक्षता घेऊन आत गेलो. ५ वाजल्यावर १० एक मिनीटे होऊन गेली होती. गांधी आणि त्यांच्या जवळचे लोक खोलीच्या आतल्या परिसरातुन प्रार्थना स्थळाकडे निघु लागल्याच मला दिसलं. ते जिथुन अंगणाच्या पायर्या चढतील त्या ठिकाणच्या आसपास लोकांच्या आवरणात मी उभा राहीलो. गांधी पायर्या चढुन ५-६ पावलं पुढे आले, गांधींच्या भोवताली लोक असले तरी मला हवी असलेली मोकळीक मला मिळतेय एवढं मी बघितलं होतं. मला आणखी ३ सेकंदाचा वेळ हवा होता. दोन पावलं पुढे सरकुन गांधींच्या पुढ्यात जाणं, शस्त्र बाहेर काढणं आणि गांधींनी आपल्या जीवनात जी म्हणुन उपयुक्त देशसेवा केली, त्याग केला त्यासाठी त्यांना वंदन करणं. त्या दोन मुलीतली एक गांधींच्या जवळ होती. तिला दुखापत होईल अशी मला भीती होती. त्यावरील उपाय मनात योजुन मी पुढे सरलो. गांधींना नमस्ते या शब्दात वंदन केलं, एक पाऊल पुढे सरलो आणि............. आधीच क्लेश असलेले गांधी "अह्" असा अस्पष्ट आवाज करतं अचेतन होऊन खाली पडले.
वध झाला आणि मला अटकही करण्यात आली. पोलीस अधिकार्यांनी मला रात्रभर जागवल नाही पण ते कदाचित रात्रभर जागले असतील. खरं तर मला त्यांना एकट जागतं ठेवणं तस जीवावर आलं होतं पण मग मी विचार केला, मी दुपारी जागा होतो, पिस्तुल स्वच्छ करत होतो, त्यात गोळ्या भरत होतो. त्यावेळी त्यांनी वामपुक्षी घेतली असेल कदाचित, मग आता ते थोडे जागले तर काय बिघडलं. शांत झोप लागली मला त्या रात्री, अखंड हिंदुस्तानात आम्ही दोघच त्या रात्री शांतपणे झोपलो असु. कोठडीत झोपलेला मी आणि शितगृहात चिरनिद्रा घेणारे गांधी. बाकी सर्व देश धगधगत होता. काहींची कत्तल होत होती तर काही कत्तल करत होते. मातेच्या उदरातील गर्भही त्यारात्री शांतपणे पोहुरले नसतील. माझ्या आई - वडिलांना स.बु. बर्वेंनी आदल्यारात्रीच फरासखान्यावर नेवुन ठेवले, त्यामुळे ते वाचले. पण माझ्या भावाला दत्तात्रयला मात्र मारहाण झाली दुसर्या दिवशी तर सकाळ पासुन तर अटकसत्राला सुरुवातच झाली. विष्णु करकरे, डॉ. परचुरे, शंकर किस्तय्या, मदनलाल, नाना आपटे आणि तात्याराव सावरकर, एकेक करत सगळे मंडळी जमा होऊ लागले. तात्यारावांना तर याखटल्यात उगाचच गोवण्यात आल होतं. पण खरं सांगु का? तात्यारावांना अटक झाली याचा मला एक वेगळाच फायदा मिळाला. तो म्हणजे त्यांचा मिळालेला उदंड सहवास, तात्याराव निर्दोष होते त्यामुळे ते निर्दोष मुक्त
होणार ही सर्वांनाच खात्री होती. पण बाहेर असे तात्याराव एकटे कधीच भेटत नसतं. त्यांच्याबरोबर असणारी लोकांची वर्दळ त्यांच लिखाण, सभा. पण इथे तात्याराव फक्त आमचेच होते. खुप शिकायला मिळालं त्यांच्या सहवासात, आयुष्याचे शेवटचे दिवस अगदी चांगले गेले, सत्कारणी लागले. मृत्युंजयच तो मृत्युची सावली सुद्धा त्यांच्यापासुन अंग चोरुन उभी होती. एकदा आम्ही असेच सर्वे गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात एक सिनीयर जेलर राऊंडसाठी आला, आम्हा सगळ्यांकडे एक एक पुठ्याच कार्ड दिलेलं असायचं त्याच्यावर कैद्याच नाव आणि त्याच्यावर लागलेली कलम असायची त्या जेलरला पाहताक्षणी तात्याराव उठले त्यांनी आपल्या पुठ्याच कार्ड छातीशी धरलं जेलर ओशाळला म्हणाला, ' सावरकरजी ये क्या कर रहे है ' तात्याराव म्हणाले, ' क्या कर रहां हुं? यही तो जेल का कानुन है वही तो मै कर रहां हुं.' जेलर म्हणाला, 'मगर बाकी लोक भी तो है, वे तो खडे नही रहें.' तात्याराव म्हणाले, ' वह तो बच्चे है. मै दुबारा हुं.' तुरुंगात दुसर्यांदा येणार्या कैद्याला दुबारा म्हणतात. तात्याराव खरचं दुबारा होते, स्वातंत्र्यापुर्वीही त्यांनी कारावास भोगला परकीय सरकारशी लढले म्हणुन आणि स्वातंत्र्यानंतर स्वकीय सरकारने त्यांना कारावासच भोगायला लावला. आम्हाला लाल किल्यात ठेवलं होतं. विषेश न्यायालय तिथेच भरायचं न्यायालय नसेल त्यादिवशी मोकळा दिवस असायचा. गप्पा तर अशा रंगायच्या की कोणाला वाटेल सहलीसाठी मित्रमंडळी जमली आहेत की काय. शिक्षेच सावट आम्ही सर्वांनीच मान्य केललं असल्यामुळे ते कोणालाच जाणवलं नाही, ती आम्हाला सावलीच वाटायची आणि मृत्युदंड हा तर मुक्ततेचा मार्गच. फासाचा दोर मला जाणवत होता तो पोलीस अधिकारी, जेल कर्मचारी आणि न्यायमुर्तींच्या चेहर्यावर. त्यांच्या चेहर्यावरच्या सुरुकुत्या सुंभाने विणल्या आहेत की काय असे वाटतं होतं. पोलीस सुप्रिटंडट शेख चिडचीडल्यासारखे वागत होते. अर्थात ही चीडचीड माझ्यावर नव्हती, स्वतःवरच होती. तिरडी बांधणार्यामाणसाची तत्परता त्यांच्या हालचालीमध्ये मला जाणवत होती. तिरडी बांधायला तर हवी पण आपल्या माणसाला आपण आपल्या हाताने शेवटच्या प्रवासाला घेऊन जायचे त्याला अग्नी द्यायचा, या कल्पनेने डोळ्यात अश्रु आल्याशिवाय राहत नाही. अजुनपर्यंत मजबुतपणे तिरडी वाहुन नेणारे खांदे मी तरी पाहीले नाहीत. मृत्यु माणसानाच नाही तर पशुंनाही जाणवायला लागला होता. आम्ही एक मांजराच पिल्लु पाळलं होतं लाल किल्यावर, मोठ मजेत होतं. दिवसभर खेळायचं उन्हात आणि सगळ्यांकडुन दुध वसुल करायचं. कधी माझ्या पांघरुणात येऊन शिरायचं तर कधी नानाच्या कधी तात्यारावांच्या डोक्यावर जाऊन बसायचं. तात्याराव एकदा गमतीने म्हणाले सुद्धा गेल्याजन्मी गोरा साहेब असला पाहीजे. गेल्या जन्मीची हौस या जन्मी भागवुन घेतो. न्यायमुर्ती निकालपत्र वाचणार होते त्याच्या आधीची रात्र, ते पिलू माझ्या अंथरुणाजवळ झोपलं होतं मध्यरात्री अचानक ते ताडकन् उठुन जाग झालं आणि कोठडीतुन पसार झालं. माझ्याबरोबर सावली सारखा चालणारा मृत्यु त्याला जाणवला असेल कदाचित. मला मात्र मृत्यु कधीच टोचला नाही बोचला नाही. जाणीवेच्या गाभार्यात कधीच तो सलला नाही. मी कस्तुरी सारखा पचवला असेल बहुदा. त्याचा सुगंध मला कधी जाणवलाच नाही. पण आमच्यात एकटा पडला तो दिगंबर बडगे. तो माफीचा साक्षीदार होता. बडगेचा मला कधीच राग आला नाही. त्याचा विचार मनात आला की फक्त कीव यायची. एखादी गोष्ट सत्सद विवेकबुद्धीने मनात स्मरुन केली तर मग परिणामांना कसं सामोर जायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. परिणामांचा विचार केला नाही तर कातडी गमावते पण आतला माणुस एकसंध राहतो तो दुभंगत नाही यालाच सदेह वैकुंठाला जाणे असे म्हणतात. बडगेने पहिला मार्ग स्वीकारला त्यामुळे तो एकाकी पडला. माझी आणि बडगेची फक्त एकदा आणि एकदाच भेट झाली. वरवर ती भेट अपघाती वाटत असली तरी नीट विचार केला तर वाटतं की घटीत होती. इंस्पेक्टर सावंतांनीच ती घडवुन आणली होती. इंस्पेक्टर सावंत हा एक वेगळाच माणुस होता तो जर न्यायासनावर बसला असता तर त्याने आम्हा सगळ्यांनाच मुक्त केलं असतं. बडगेला त्यादिवशी कोर्टात माफीचा साक्षीदार म्हणुन हजर करणार होते, तेव्हा इंस्पेक्टर सावंतांनी बडगेची आणि माझी भेट घडवुन आणली. सांवंतही तिथेच होते कारण सत्याला साक्षीदाराची अडचण येत नसते. बडगेला पश्चाताप झाला होता मी म्हणालो त्याला की पश्चातापाला काही अर्थ नसतो कारण क्रिया आधीच घडुन गेलेली असते. तु चुकला असशील असे तुला वाटत असेल तर तो समज मनातुन काढुन टाक. जगण्यासाठी प्रयत्न करणं जीव वाचवण्यासाठी धडपडण हा गुन्हा नाही. तो धर्म आहे, नव्हे ते प्रथम कर्तव्यच आहे. पण आपला जीव वाचवत असताना आपण इतर कुणाचा जीव अनाठायी घेत नाही ना, याची जाण ठेवावी. तु हिंदु आहेस हे जर तु नाकारलं असतं तर मला तुझी शरम वाटली असती. पण तुझ्या निवेदनाने माझ्या फासाचा दोर भक्कम झाला तरी मला तुझा राग येणार नाही. कारण मी मरणाला सिद्ध आहे. एकास एक हा सृष्टी नियमच आहे गांधी मेले नथुराम मेलाच पाहीजे. फक्त आपले निवेदन सत्य असेल याची काळजी घ्या. आपला जीव वाचवण्यासाठी सुद्धा खोटं निवेदन देऊ नकोस. तात्याराव निर्दोष आहेत. त्यांना अडकवण्याचा खोटा प्रयत्न जर तुझ्या मुखातुन होत असेल तर तुला वरच्या दरबारातही क्षमा नाही. अरे तात्याराव हीरा आहे. आपण फक्त कोंदण, कोंदणाने हीर्याचा आकार घ्यायचा असतो हीरा झाकवायचा वेडा प्रयत्नदेखील करायचा नसतो. एवढे सांगुन त्याला तेथुन जाण्यास सांगितले. बडगे आणि माझ्यामध्ये भेट घडवुन दिल्यामुळे इंस्पेक्टर सावंतांचे आभारच ते. सुर्याची काळजी करणारे आपण कोण? सुर्याला ग्रहण लागत अस आपल्याला वाटत, तोही आपल्याचा दृष्टीचा दोष असतो, बघण्याची आपली जागा चुकलेली असते. उद्या माणुस चंद्रावर उतरला तर त्याला
जाणवेल, सुर्याला कधीच ग्रहण लागत नाही.
खटला संपला! मला आणि नानाला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. हा खटला मी स्वतःच चालवला असल्याने वधामागची भुमिका स्पष्ट करु शकलो. आम्हा दोघांना लाल किल्याहुन आता अंबाला येथे नेणार होते कारण फाशीची सोय तिथेच होती. माझी इच्छा होती की येरवड्याला न्यायची, आई - वडिलांचं शेवटच दर्शन घेता आलं असतं. तसा अर्ज करण्याची सुचनाही मला सावंतांनी केली होती. पण आता कुठलीही इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार मला कसा असणार, मला आठवत होत की जेव्हा मला लाल किल्ल्यात आणल गेल तेव्हा सही करुन माझा चार्ज बॉडी रिसीट म्हणुन घेतला होता . नथुराम गोडसेचा शासकीय कागदपत्रात एकदा बॉडी म्हणुन उल्लेख झाला तेव्हा पासुन माझ्यातला मी उरलोच कुठे होतो. उद्या अंबाल्याच्या पोलीस पार्टीला नथुरामचा चार्ज नव्हे तर बॉडीचा चार्ज देणार आणि तेही बॉडीचाच चार्ज घेणार, आता या बॉडीची डेडबॉडी होणं ही फक्त एक औपचारिकता. आई - वडिलांची भेट व्हावी कारन त्यांना मला शेवटच भेटता याव म्हणुन, दिल्लीला येतानाच त्यांच शेवटच दर्शन झालं, असो. अंबाल्याला जायचं होत म्हणजे पानीपत मधुन चला त्या निमित्ताने त्या पवित्र भुमीच दर्शन तरी झालं. नाहीतर एरवी कशाला जाण झाल असतं. माझा अलिप्तपणा पाहुन सुप्रिटंडट शेखना माझा रागही येत असे. पण खटला चालु असताना त्यांच्या बसण्याच्या जागेवर गुलाबाची फुलं कोण आणुन ठेवतो हा प्रश्न मला नेहमीच पडत असे मी शेखना नेहमीच विचारायचो आणि ते नेहमीच उत्तर द्यायला टाळाटाल करायचे. पण अंबाल्याला जाण्याच्या आधी शेखानी मला माझ्या प्रश्नाच उत्तर दिलं. ती गुलाबाची फुलं त्यांची मुलगी जास्मीन आणुन द्यायची. ती गर्भवती असुनही, माझ्यासाठी ती दररोज दर्ग्यात जाऊन मन्नत मागायची. तिला प्रत्यक्ष जाऊन धन्यवाद देणे तर शक्य नव्हते पण सुप्रिटंडट शेख याच्या मार्फत तिला मी निरोप पाठविला की जर तुला तुझ्या या भावावर इतक प्रेम असेल तर तुला होणार्या बाळाची काळजी घे तुला मुलगाच होईल त्याच्यावर माझे संस्कार कर. उद्या जेव्हा या देशाला नथुरामची गरज पडेल तेव्हा हवा असलेला नथुराम तु जन्माला घाल. सुप्रिटंडट शेखांचे डोळे पाणावले. मला म्हणाले, ' पिस्तुलाच्या गोळीचा चाप ओढण्यासाठी मला या वर्दीच चिलखत घालाव लागत पण तु कुठलच चिलखत नसताना चाप ओढलास.' मी त्यांना म्हणालो की मला इतका मोठा करु नका शेख साहेब मी इतका मोठा नाही आहे. माझ्यात मोठेपणा असलाच तर तो इतकाच की ज्या वेळी जे करण गरजेच होत ते मी केलं. परिणामांची कल्पना असताना, पण माझ्याही अंगावर चिलखत होतच. काश्मिरला माझ्या देशातील सैनिकांनी सांडलेल्या रक्ताच चिलखत, फाळणीच्या वेळी माझ्या हिंदु बांधवांच्या रक्ताच चिलखत, माता भगिनींच्या भ्रष्ट झालेल्या शीलाच चिलखत, सावरकरांच्या विचारांच संस्कारांच चिलखत. मी काहीच केलं नाही मी तर फक्त ऋण फेडलं. पण हा नथुराम मातृभुमीकरीता फक्त एकच जीव ओवाळु शकतो याची खंत आहे.' खोट नाही सांगत पण मृत्युची मलाही खंत वाटली, मी मृत्यंजय नाही आहे. फासाच्या दोरावर लटकण्यापुर्वी जेव्हा माझ्या चेहर्यावर काळा बुरखा चढवला तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रु आले या मातृभुमीच दर्शन परत घेता येणार नव्हते, या मातीचा सुगंध, सिंधु नदीचा स्पर्श मला कधीही घेता येणार नाही. या सगळ्यांच दुःख मलाही जाणवलं.
अंबाल्याला नाना आपटे आणि मी पोहचलो. माझी कोठडी फाशीखान्याच्या समोरच होती. फाशी होण्याआधी त्याची रंगीततालीम चालु होती. तुम्हाला वाटेल की अरे फाशीची सुद्धा रंगीततालीम चालते? हो चालते. माझ्या वजनाची बाहुली घेऊन त्याची रेग्युलर हेंगिंग प्रमाणे तालीम होत होती. पण बाहुली बनवताना काहीतरी घोळ झाला होता सगळे घामाघुम झाले होते बिचारे, हेंगिंग स्टाफचे लोक म्हणत की, काय म्हणे मानेला ' प्रॉपर चर्क ' भेटत नाही. मी त्यांना म्हणायचो बाहुलीच्या बदली मला उभे करा, हो पण ते त्यांच्या नियमात बसत नव्हते, असो. फासावर जाण्यापुर्वी हातात काही पकडता येईल का? असा प्रश्न इंस्पेक्टर सावंतांना केलाहोता पण त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यास टाळाटाळ केली होती. तसं आमच्याकडे अखंड हिंदुस्तानाचे मानचित्र, भगवा ध्वज आणि भगवतगीता एवढेच सामान होते. ते अखेरच्या श्वासापर्यंत आमच्या जवळ असावे अशी आमची इच्छा होती. येथील जेलरांनी आम्हा दोघांना फासावर जाताना त्या वस्तु बाळगण्याची परवानगी दिली.
फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी व्हायला ८ दिवस शिल्लक असताना गांधींचे सुपुत्र देवीदास गांधी मला भेटायला आले. तशी आधी आमची भेट झाली होती एका पत्रकार परिषदेत, ते हिंदुस्तान टाईम्सचे पत्रकार म्हणुन आले होते आणि मी अग्रणीचा संपादक म्हणुन. गांधी वधाच्या दिवशी मला अटक केली तेव्हाही ते मला भेटायला आले होते आणि त्यांना व त्यांच्या परिवाराला झालेल्या वैयक्तिक नुकसानाबद्दल मी त्यांचे सांत्वनही केले. या वधामागील भुमिका काय होती? हे मी तुम्हाला सांगीन असा शब्दही त्यांना दिला होता. तसं खाजगीत भेटणं नियमानुसार शक्य नव्हतं पण जेलर साहेबांनीच तशी सोय केली होती. मी देवदासना म्हणालो, आज कस काय येणं केलत दोन वर्षांनंतर वेळ मिळाला. थोडसं संकुचित मनाने ते मला म्हणाले काही कागदपत्रावर सही हवी आहे तुमची. ती कागदपत्र म्हणजे वकालतनामा त्यांना माझी केस स्वीकारायची होती. देवीदास यांच्या म्हणण्यानुसार मी कोर्टात केस लढवताना काही मुद्दे वगळले होते. त्यांना माझ्या फाशीला आव्हान द्यायचे होते पण मी त्यांना म्हणालो मी वध केला आहे त्यामुळे मला जगण्याचा अधिकार नाही. मी तुम्हाला माझे वकीलपत्र नाही देऊ इच्छित. त्याच कारण त्यांनी माझ्याकडे विचारल मी त्यांना म्हणालो, तुम्ही वकालतनामा पुढे केलात तेव्हाच मी समजलो पण तुम्ही दुखावु नये म्हणुन उत्तर द्यायचे टाळत होतो. गांधींना हिंसा मान्य नव्हती म्हणुन त्यांच्या मारेकर्यालाही देहदंड देऊ नये हाच युक्तिवाद आहे तुमचा पण तो कायद्यात बसत नाही वकिलाने कायदा समजवुन मगच वकालतनाम्यावर सही मागायची असते कायद्याच्या कक्षेत भावना व्यक्तिगत हेवेदावे नाहीत. केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठीच ते माझ्याकडे आले होते. पुढे मी त्यांना म्हणालो तुम्हाला वकिलपत्रच जर स्वीकारायच होत तर तुम्ही तात्याराव सावरकरांच का नाही स्वीकारलं? नाना आपटेंच का नाही स्वीकारलं? या निरपराध माणसांच्या बचावाला तुम्ही का नाही उभे राहीलात? तुम्ही बचावाला उभे राहताय तर नथुराम गोडसेच्या का तर एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करायचा हे आपल्या पित्याच तत्वज्ञान सिद्ध करण्याचा क्षीण प्रयत्न म्हणुन. हे ऐकुन देवीदासना कदाचित वाईटही वाटल असेल. एक व्यक्ति या कक्षेपलिकडे एक विचार म्हणुन गांधींचा विचार मी करु शकत होतो तसे देवीदास करु शकत नव्हते. तुम्ही काय विचार केलात? असा सवाल देवीदासजींनी मला विचारला. पण हा प्रश्न विचारायला त्यांनी दोन वर्षे विलंब लावला. तशी मागे मी त्यांना ग्वाही दिली होती. या वधामागचा उद्देश वैयक्तिक कधीच नव्हता उद्देश फक्त राजकीय आणि राजकीयच होता. पण त्यांना मात्र हे पटत नव्हतं आणि कुठेतरी हे पटवुन घेण्याचा प्रामाणीक प्रयत्न ते करत होते त्यासाठीच ते माझ्याकडे आले होते हे माझ्या लक्षात आलं. आणि त्यांनी प्रयत्न केला तो त्यादिवशीच कारण ८ दिवसानंतर नथुरामच्या बचावाचे सारे मार्ग बंद झाले ते शल्य त्यांना आयुष्यभर सलत राहणार होते. आज वेळ गेली तर पुन्हा वेळ येणार नाही. त्यांना मी बसायला सांगितले. आणि म्हणालो की देवीदासजी मी माझ मृत्युपत्र लिहलं आहे त्यात माझी पहिली अंतिम इच्छा काय लिहीली आहे सांगु? सिंधु नदी अखंड हिंदुस्तानात येईपर्यंत माझ्या अस्थी विसर्जित केल्या जाऊ नयेत, मगच त्या सिंधु नदीत विसर्जित कराव्यात. पिढ्यान पिढ्या हस्तांतरीत केल्या तरी चालतील पण त्या जतन कराव्यात. देवीदासजी आपल्या हिंदु धर्मात अस्थी दहाव्या दिवशी विसर्जित करतात तो पर्यंत त्या घराबाहेर बांधुन ठेवतात. अस्थींच विसर्जन होत नाही तोपर्यंत आत्म्याला मुक्ति मिळत नाही असा समज आहे. पण मी जाणुन बुजुन माझा आत्मा बंधनात ठेवणार आहे, त्याला मुक्त होऊ देणार नाही. कारण गांधी जसे तुमचे पिता आहेत तसे ते माझेही राष्ट्रपिता आहेत म्हणुन. गांधींनी शेवटची इच्छा प्रदर्शीत केली होती की त्यांची रक्षा सर्व नद्यांमध्ये विसर्जित केली जावी पण पाकिस्तानने त्यांची रक्षा सिंधु नदीत विसर्जित करायची परवानगी नाकरली जणु काही ते पाक पाणी त्यांच्या रक्षाच्या स्पर्शाने अमंगल होणार होते, तेव्हा मी एक खास पत्र पाठवुन भारत सरकारला विनंती केली होती गांधींच्या रक्षेचा काही अंश तरी जतन करा कारण या देशाचे शुर जवान केव्हा तरी सिंधु नदी हिंदुस्तानात खेचुन आणतीलच तेव्हा ती रक्षा सिंधु नदीत विसर्जित करा आणि हे कधीतरी होईलच कारण हा देशच भगिरथांचा आहे गंगा खेचुन आणणार्यांचा आहे. पण माझी विनंती मानली गेली नाही. गांधींचा तो तडफडणारा आत्मा एकाकी पडु नये म्हणुन दहाव्या दिवशी मी माझा आत्माही मुक्त होऊ देणार नाही. मरणांत आणि वैराणी असे सगळेच म्हणतात पण आयुष्यभर जी मुल्य पुजली त्यांना मृत्युनंतरही वंदन करणारा नथुराम एकच असतो. देवीदासजी तुमच्या पित्याशी माझं वैयक्तिक वैर काहीच नव्हतं पण त्याच भौतिक अस्तित्व संपवण्यात माझ्या देशाच भलं होतं. मी विद्वान नसेन देवीदासजी पण विद्वान माणसांच्या सहवासात मी आयुष्याची काही वर्षे काढली आहेत अगदी श्रीमंत नसलो तरी खाऊन पिऊन सुखी होतो. माझही स्वतःच एक स्थान होतं मान मरातम होता. गांधींचा वध करण्यापुर्वी त्यानंतर मी या सगळ्या गोष्टींना मुकणार आहे याची मला जाणीव होती पण मी मृत्यु स्विकारला भेकडासारखा पळुन नाही गेलो मला माझी भुमिका मांडायची होती. कारण माझ्याकडे माझी अशी भुमिका होती, विचार होता. गांधी हे महान होतेच जे सत्य आहे ते मी स्विकारण्याची आणि नाकारण्याची काहीही गरज नाही. दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेशाविरुद्ध त्यांनी जो निर्भिड लढा दिला तो स्तुत्यच आहे. भारतात परत आल्यानंतर खेड्यापाड्यात जाऊन खरा भारत बघण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला तो आदरणीयच होता. दांडी यात्रा, चलेजाव चळवळ, मीठाचा सत्याग्रह या सर्वांमुळे मी स्वतः त्यांचा भक्त होतो गांधींना अटक झाली तेव्हा "साबरमतीनो संत जेल मा छे" या घोषणा माझ्याही ओठांवर होत्या. पण फाळणी अनावश्यक होती, तो गांधींचा निर्णय चुकीचा होता. त्यानंतर निर्वासितांची झालेली कत्तल, काश्मिरला लढणार्या आपल्या देशाच्या सैनिकांविरुद्ध पाकिस्तानला मदत म्हणुन दिलेले ५५ कोटी रुपयांच अनुदान हे सगळ अक्षम्य होतं. गांधीनी कधी हिंदु मुस्लिम असा पक्षपात नाही केला पण पाकिस्तानने केला आणि गांधींचा सर्वात मोठा पराभव हाच आहे. गांधींच्या रक्षा सिंधु नदीत विसर्जित करायला त्यांनी नाकारल्या, गांधी गेले तेव्हा पाकिस्तान आकाशवाणीने बातमी दिली की हिंदुंचा एक पुढारी गेला आम्ही गांधींना हेच सांगत होतो गांधी तुम्ही आमचे आहात पण ते म्हणत होते नाही मी तुमचा नाही मी त्यांचा आहे. गांधींचा आणि गांधीवादाचा विरोधक जितका मी नाही तितके त्यांचे शिष्य आहेत.मी गोळी झाडली गांधी कोसळले पडता पडता त्यांच्या तोंडातुन "अह्" असा अस्पष्ट आवाज आला. पण सगळीकडे अफवांच मोहोळ उठलं की गांधी हे राम म्हणाले. माझा जबाब नोंदवताना कोर्टात जबानी घेताना माझ्या मुखातुन हे असत्य वदवण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला जात होता पण मी बदललो नाही. गांधी हे राम म्हणालेच नाही तर मी असत्य का बोलु? पण जर त्यांच्या शिष्योतमांनी जर का हा डंका असाच पेटत ठेवला आणि इतिहासात त्याची नोंद झाली तर गांधींचा आणि गांधीवादाचा सर्वात मोठा पराभव ठरेल. देवीदास म्हणाले हे कसं काय होऊ शकतो? मी म्हणालो ज्या माणसाने आयुष्यात कधीही राम आणि रहीम, कृष्ण आणि करीम यांच्यात कधी भेद केला नाही समजला नाही तो माणुस मरताना फक्त रामाचच नाव घेईल राम आणि रहीम दोघांचही घेईल ना आणि कुणा एकाचच जर घ्यायच असेल तर रहीमच घेईल कारण राम त्यांच्या हृदयात होता आणि रहीम मुखात.
१५ नोव्हेंबर १९४९ सकाळी आठ वाजता नथुराम गोडसे आणि नाना आपटे यांना फाशी देण्यात आली हातात अखंड भारताचे मानचित्र भगवा ध्वज आणि भगवदगीता दोघांनीही घेतली होती. फासाचा दोरं गळ्यात अडकवल्यावर दोघांनीही अखंड भारत अमर रहे आणि वंदे मातरम् असा घोष केला. त्यानंतर पायाखालील फळीचा दांडा ओढण्यात आला